महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar) मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दु:ख सावरता आलं नाही. अशातच मिटकरी यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची.. सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी आदरणीय दादांची होती, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले. त्यानंतर त्यांनी मनातली शंका व्यक्त केली.मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामं आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र, हे प्रश्न माझं मन विचारतंय.
अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? असंही सवालही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तसेच एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असा प्रश्नांचा भडिमार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही मिटकरी यावेळी म्हणाले.




