spot_img

How to avoid negative thoughts : मोबाईलच्या अतिवापरामुळे मनःशांती हरवलीये? ‘कश्यप मुद्रा’ आणि ‘हे’ ५ उपाय ठरतील रामबाण!

spot_img

नकारात्मक विचारांचा विळखा सोडवण्यासाठी सोप्या घरगुती ट्रिक्स; मेंदूला मिळेल नवी उभारी

आधुनिक युगात धावपळीची जीवनशैली आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तासनतास लॅपटॉपवर काम केल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी आपण पुन्हा मोबाईलमधील रिल्स आणि शॉर्ट्समध्ये गुंततो. यामुळे मेंदूवर माहितीचा प्रचंड भार पडतो, परिणामी मानसिक थकवा, चिडचिड आणि नकारात्मक विचार वाढतात. या समस्येवर साक्षी देसाई यांनी सोशल मीडियाद्वारे काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय सुचवले आहेत, जे आपली हरवलेली मनःशांती परत मिळवून देऊ शकतात.

नकारात्मक विचारांचा प्रवाह थांबवण्यासाठी ‘कश्यप मुद्रा’ हा एक उत्तम योगप्रकार आहे. यासाठी सुखासनात बसून अंगठा करंगळीच्या मुळाशी ठेवून मुठी आवळावी आणि दोन्ही हात मांड्यांवर ठेवून १०-१५ मिनिटे दीर्घ श्वास घ्यावा. या मुद्रेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, एकाग्रता वाढते आणि मनातील भीती किंवा चिंता दूर होण्यास मदत होते. यासोबतच जेव्हा डोक्यात वाईट विचार येतात, तेव्हा ते एका डायरीत लिहून काढल्याने मन हलके होते.

केवळ शारीरिक व्यायामच नाही, तर दिवसातील किमान १० मिनिटे केलेले ध्यान (Meditation) विचारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. मोबाईलपासून ठराविक वेळ लांब राहून वाचन किंवा छंदासाठी वेळ दिल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर मानसिक ताण असह्य होत असेल, तर आपल्या विश्वासू व्यक्तीशी किंवा तज्ज्ञांशी संवाद साधणे कधीही श्रेयस्कर ठरते. जीवनातील लहान-लहान चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त केल्याने नकारात्मकतेचा अंधार दूर होऊन मानसिक शांतता लाभते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ