Summer Drinks To Prevent Heatstroke : उन्हाळ्याच्या झळांपासून वाचण्यासाठी ‘ही’ ५ मसालेदार पेये ठरणार रामबाण उपाय; चवीसोबतच आरोग्याचाही खजिना!

spot_img

केवळ गोड सरबतच नाही, तर पन्हं, सत्तू आणि मसाला ताक देणार उष्माघातापासून संरक्षण; हायड्रेटेड राहण्यासाठी तज्ज्ञांचा खास सल्ला

उन्हाळ्याचा पारा वाढू लागला की शरीरातील पाण्याची पातळी वेगाने खालावते आणि उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढतो. अशा वेळी केवळ साखरेची गोड पेये पिण्यापेक्षा पारंपरिक आणि मसालेदार पेयांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. ही पेये केवळ तुमची तहान भागवत नाहीत, तर शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवून ऊर्जादेखील देतात. यामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले ‘कैरीचे पन्हं’ व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असून काळी मिरी आणि पुदिन्यामुळे ते शरीराला आतून थंडावा देते.

बिहारचे प्रसिद्ध ‘सत्तू सरबत’ हे प्रथिनांचा (Protein) मोठा साठा मानले जाते. भाजलेल्या जिऱ्याची पूड, कांदा आणि कोथिंबीर मिसळलेले हे पेय उन्हाळ्यात नैसर्गिक ढाल म्हणून काम करते. पचनासाठी ‘मसाला ताक’ आणि ‘जलजीरा’ हे सर्वोत्तम पर्याय असून, त्यातील काळं मीठ आणि जिरे पचनसंस्था सुरळीत ठेवतात. तसेच, कोकणचे लाडके ‘कोकम सरबत’ शरीरातील आम्लपित्ताचा त्रास कमी करून ताजेतवाने करते. महत्त्वाची बाब म्हणजे, बाजारातील कृत्रिम रंगांची पेये टाळून घरी बनवलेली ही नैसर्गिक पेये प्यायल्यास उन्हाळ्यातील थकवा दूर होऊन आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ