Raghav Chadha : आपला मोठा राजकीय धक्का; राज्यसभेचे 7 खासदार भाजपमध्ये जाणार

spot_img

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे. आम आदमी पक्ष (आप) ला मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत असून, पक्षातील सात राज्यसभा खासदार भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या संदर्भात माहिती देताना राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, स्वतःसह हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, अशोक मित्तल आणि संदीप पाठक हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यसभेत सध्या आपचे एकूण १० खासदार असून, त्यापैकी ७ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे संसदेमधील आपची भूमिका आणि प्रभाव यावरही परिणाम होऊ शकतो.

यावेळी बोलताना राघव चड्ढा यांनी सूचक इशारा देत सांगितलं की, येत्या काळात आणखी काही नेते पक्ष सोडू शकतात. त्यामुळे हा केवळ सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. या घडामोडीमुळे देशातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आप पक्षासाठी ही मोठी कसोटी मानली जात असून, आगामी काळात पक्ष कशी भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ