Sanjay Raut on PM Narendra Modi : मोदींच्या ‘इन्स्टाग्राम रील’ आणि सुरक्षेवरून संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, “देशातील वातावरण अत्यंत…”

spot_img

विद्यार्थी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्र्यांवर हल्लाबोल करतानाच, संजय राऊतांनी वाढवलेल्या सुरक्षेवरून सरकारला खोचक टोला लगावला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर रील करून पेपर लीक प्रकरणावर माहिती दिल्यानंतर आणि मंत्र्यांनाही तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी रील्स बनवण्याचा सल्ला दिल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार वाद पेटला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर तीव्र शब्दोंामध्ये निशाणा साधला आहे. जंतर-मंतरवरील ‘जेन-झी’ मुलांच्या आंदोलनाने सरकार आणि त्यांच्या आयटी सेलला मेटाकुटीस आणल्याचे सांगत, पंतप्रधानांची झोप उडाली आहे आणि अशा गोंधळलेल्या व्यक्तीने खुर्चीवर राहणे देशासाठी धोकादायक असल्याची टीका राऊतांनी केली.

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री, मंत्री व महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा वाढवण्याचा घेतलेला निर्णय यावरही राऊतांनी भाष्य केले. महाराष्ट्रात सरकारविरोधी वातावरण प्रचंड तापले असून मंत्र्यांना व आमदारांना पदोपदी धोका असल्याचे त्यांनी म्हटले. विशेषतः गद्दार आमदार-सांसद यांनी लोकांच्या नजरेत पडू नये, असा इशारा देत, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याचे खोचक शब्दांत सांगितले.

देशातील बिघडलेली परिस्थिती आणि वाढलेला जनक्षोभ यावर बोलताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांना थेट सावध राहण्याचा सल्ला दिला. जनतेशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळेच ही सुरक्षा वाढवावी लागली असून, प्रसंगी केंद्राकडे आर्मीची मागणी करावी, असा उपरोधिक टोला त्यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ