Harshwardhan Sapkal : नीट पेपरफुटीवरून ठाकरे बंधू आक्रमक; २६ जुलैला मुंबईत महामोर्चा, काँग्रेसचाचाही मिळाला पाठिंबा

spot_img

एकाच मंचावर दिसणार राज आणि उद्धव ठाकरे; आंदोलक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी युवासेना मैदानात, तर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरात

देशभर गाजलेल्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणाविरोधात आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांच्या समर्थनार्थ आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ठाकरे बंधू अर्थात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे आक्रमक भूमिका घेत आगामी २६ जुलै रोजी मुंबईत भव्य महामोर्चाची हाक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणाऱ्या या मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोर्चाच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली असून, काँग्रेस पक्षानेही या आंदोलनात उडी घेत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते एकाच मंचावर एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जावी आणि त्यांच्यावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ नये, यासाठी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश देत ऑनलाईन बैठकीत खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या आक्रमक भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच काळात राज्यातील सर्वात मोठा ‘टीईटी’ (TET) परीक्षा घोटाळा झाला होता, ज्यामध्ये अनेक आयएएस अधिकारी आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्याचे प्रकार घडल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून,” असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ