तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन.
सध्या शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक घटना कानावर पडतायत. सुशिक्षित मुलींना शेतकरी तरुणापेक्षा शहरातील नोकरदार मुलाला अधिक पसंती असल्याचं चित्र असताना ग्रामीण भागातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड होऊन बसलंय. नुकतंच अकोल्यातील एका तरुणांनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून ‘ मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही ‘ असं साकडं घातल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता कामाला लावलं आहे .
8 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अकोल्यात आले होते. कान्हेरी सरपंच येथील शेतकरी संवाद कार्यक्रमानंतर एका 34 वर्षीय पठ्यानं शरद पवारांना लग्नासाठी पुढाकार घेण्याचं निवेदन दिलय. या निवेदनाची सध्या एकच चर्चाय. एकीकडे वय वाढत जातंय. आता लग्न झालं नाही तर भविष्यात माझं लग्न होणार नाही. मी एकटाच राहील .माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही असं साकडे या तरुणांना घातल्याने शरद पवारांसह अनिल देशमुख आणि इतर नेते स्तब्ध झालेत. हे पत्र दुसऱ्या दिवशी मुंबईत (Mumbai) शरद पवारांनी जयंत पाटलांसह आपल्या इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवलंय. या पत्रावर चर्चा झाली आहे. या तरुणासाठी जे करता येईल ते करा अशा सूचना शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात.




