Maharashtra Politics : राज्यातील फुटीच्या राजकारणात नवे वळण,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले

spot_img

राज्यात सध्या सुरू असलेल्या फुटीच्या राजकारणामुळे विविध पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत मतभेद आणि वेगवेगळे मतप्रवाह समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाच्या भविष्यासंदर्भात आमदारांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने संघटनेतील स्थिती गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला संभाव्य विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव मांडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे बोलले जात होते, मात्र गेल्या काही दिवसांत आमदारांच्या मतांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या काही आमदार काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बाजूने असल्याची माहिती समोर येत आहे, तर काही आमदार थेट भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या मते, मतदारसंघातील विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने पर्यायी राजकीय दिशा शोधण्याचा विचार पुढे येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, त्यामुळे राजकीय अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ