Chhatrapati Sambhajinagar : विहिरीच्या कामात काळ सोकावला, काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

spot_img

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन हृदयद्रावक घटना समोर आल्या असून, यामध्ये चार तरुणांसह एका पित्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात आपल्याच शेतात विहिरीचे काम करत असताना बाजीराव काकडे आणि त्यांची दोन तरुण मुले, आजिनाथ व शाम, यांच्यावर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. ५० फूट खोल विहिरीत गाडले गेल्याने या तिघांचाही गुदमरून जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा असा भीषण अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दुसरीकडे, धाराशिवच्या परांडा तालुक्यातील भोंजा येथे सुट्ट्यांसाठी गावी आलेला १९ वर्षीय विद्यार्थी शुभम ननवरे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने आपल्या कुटुंबासमोरच त्याने प्राण गमावले. या दोन्ही घटनांमुळे ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत असून, विहिरींवरील कामात आणि पोहताना सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ