spot_img

Sanjay Raut : अशोक खरात प्रकरणावर संजय राऊत आक्रमक; मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी

spot_img

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक जण “आम्हाला काहीच माहिती नव्हती” असा दावा करत असले तरी, खरातविरोधातील आरोप नवीन नसल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर पहिला गुन्हा २००३ साली दाखल झाला होता, तर २००५ मध्येही त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याशिवाय, सकाळ या वृत्तपत्रात त्याच्याविरोधात लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी संबंधित पत्रकाराला धमक्या दिल्याची बाबही समोर आली होती. तरीदेखील काही मोठे राजकीय नेते त्याच्याकडे जात होते, त्याच्यावर विश्वास ठेवत होते, असा आरोप आता होत आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी कठोर भूमिका घेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अशा व्यक्तींना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. “जर ते त्याच्याकडे जात असतील, त्याच्या पायावर डोके ठेवत असतील किंवा जादूटोण्यासारख्या गोष्टींमध्ये सहभागी होत असतील, तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” असे राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

दरम्यान, नाशिकचे पोलीस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत असून, ते निष्पक्षपणे आणि सखोल चौकशी करतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची मुळं किती खोलवर आहेत, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ