spot_img

IMD Weather Update : महाराष्ट्रात अवकाळीचा मुक्काम वाढला; ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट

spot_img

द्राक्ष, कांदा अन् गव्हाचे प्रचंड नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची आर्त साद

राज्यात निसर्गाचा लहरीपणा थांबण्याचे नाव घेत नाहीये. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असतानाच ढगांच्या कडकडाटासह येणाऱ्या अवकाळी पावसाने महाराष्ट्राला विळखा घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, अवकाळी पावसाचे संकट अजूनही टळलेले नाही. रविवार, सोमवार आणि मंगळवारीही राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे पाऊस, कुठे उकाडा?

मंगळवारी परभणी, बीड, धाराशिव, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. एकीकडे निम्म्या महाराष्ट्रात पावसाची हजेरी असताना, दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि रायगड पट्ट्यात मात्र उन्हाचा चटका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक घामाघूम होण्याची शक्यता आहे.

शेतीचे कंबरडे मोडले :

१८ आणि १९ मार्च रोजी झालेल्या गारपिटीने नाशिकच्या निफाडमधील द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे अक्षरशः मातेरं केलं आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई भागातही वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील उभा गहू आणि ज्वारी जमिनीदोस्त झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. “उभी पिके आडवी झाली आहेत, आता सरकारने फक्त आश्वासने न देता तातडीने शेतात येऊन पंचनामे करावेत,” अशी संतप्त मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ