spot_img

Sanjay Raut : “हे अमानुष आहे” संजय राऊतांची तीव्र टीका

spot_img

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दाव्यामुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्य अजूनही या धक्क्यातून सावरत असतानाच, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही तासांत नेतृत्वबदल, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. कुटुंब, कार्यकर्ते आणि सामान्य जनता सगळेच शोकाकुल असताना त्यांच्या नावावर राजकारण सुरू करणं म्हणजे अमानुषपणा आहे. पुढील किमान १५ ते २० दिवस कोणतीही राजकीय चर्चा होणं अयोग्य असून, अशा वेळी पदे, नेतृत्व आणि डावपेचांची भाषा करणं माणुसकीला काळीमा फासणारं आहे, असा घणाघात त्यांनी केला.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब असल्याचं सांगत, कुटुंबाच्या निर्णयांवर किंवा पक्षांतर्गत घडामोडींवर बाहेरून भाष्य करणं अयोग्य असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंब पूर्णपणे कोलमडलेलं असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत. अशा परिस्थितीत नेतृत्वाच्या खेळी खेळणं म्हणजे कर्तव्यशून्यपणाचं टोक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या कथित अपघाताबाबत दोन अराजकीय मागण्या मांडल्या. विमानसेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी डीजीसीएच्या भूमिकेवर बोट ठेवलं. बारामती विमानतळावर रडार, एटीसी आणि आवश्यक यंत्रणा नसल्याच्या बातम्या समोर येत असतील, तर अशा ठिकाणी व्हीआयपी विमानांची ये-जा कशी सुरू आहे, असा थेट सवाल त्यांनी केला. राज्याने एक महत्त्वाचा नेता गमावल्याचा दावा होत असताना, अशा अपघातांची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

तसंच, अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती देणं कौतुकास्पद असलं, तरी भाजपकडून पूर्वी करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप विनाअट मागे घ्यावेत, असं राऊत म्हणाले. जे आरोप कधीच सिद्ध झाले नाहीत, ते मागे घेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

फक्त जयंत्या आणि जाहिराती न करता, न्यायालयात प्रलंबित असतील तर त्या केसेसही मागे घ्याव्यात. आज जे नेते अजित पवारांना उत्कृष्ट प्रशासक म्हणत आहेत, त्यांनी आधी केलेल्या आरोपांची जबाबदारी घ्यावी, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ