spot_img

Winter Session Of Lok Sabha : लोकसभेत ‘SIR’वरून गदारोळ, सभागृह दोनवेळा तहकूब

spot_img

 ‘NDA’कडून चर्चा टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कालपासून लोकसभेच हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. (Loksabha) या अधिवेशनात सुरुवातीपासूनच देशभरात चर्चेत असलेला एसआयआर (SIR) हा मुद्दा गाजाणार असं बोललं जात होतं. यावर लोकसभेत तातडीने चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधकांची एकजूट दिसून आली. राज्यसभेत या मुद्द्यावरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी सभात्याग केला. या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्यानंतर लोकसभेतही दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागंलं. एसआयआरवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी नसल्याने विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

देशभरात एसआयआर मोहीम अत्यंत घाईघाईने राबवली जात असून त्या दबावाखाली ४० ब्लॉक स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ‘एसआयआर’चा मुद्दा गंभीर बनत असून त्यावर आजच्या आज चर्चा सुरू केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली. यासंदर्भात राज्यसभेत सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे चर्चेसाठी नियम २६७ अंतर्गत आठ प्रस्ताव देण्यात आले. ‘एसआयआर’ किंवा निवडणूक पद्धतीतील सुधारणा असा व्यापक विषय घेतला तरी चालेल पण, त्यावर चर्चा झाली पाहिजे अशी जोरकस भूमिका विरोधकांनी घेतली.

या सर्वांवर ‘केंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नाही असं नव्हे पण, तातडीने चर्चा होऊ शकत नाही. विरोधकांनी कालमर्यादा घालू नये’, असं प्रत्युत्तर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी राज्यसभेत दिलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या उत्तराने आक्रमक झालेल्या विरोधकांनी केंद्र सरकार चर्चेपासून पळून जात असल्याचा आरोप केला. ‘द्रमुक’चे तिरुचि शिवा म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीतही आम्ही सरकारशी चर्चा केली होती. त्यांनी रात्री ९ वाजेपर्यंत निश्चित सांगू, असे आश्वासन दिले होते. पण, सभागृहाचे कामकाज सुरू झाले तरी केंद्र सरकारने ‘एसआयआर’वर चर्चा कधी घेणार हे स्पष्ट केलेले नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ