मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ विस्कळीत

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत

रविवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला होता.

पहाटे भांडुप, विक्रोळी, विद्याविहार, शीव स्टेशन या ठिकाणी पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

धीम्या मार्गावरच्या ट्रेन जलद मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचलं आहे.

पावसामुळे अनेक गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

रस्ते मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.

रोज खा एक-दोन लवंग; होतील ‘हे’ फायदे