गावखेडं असो वा आणखी काही कधीही आणि कुठेही जातीपातिचं राजकारण न करणारा नेता अशी ओळख असणाऱ्या अजित पवारांच्या जनसेवेचा व्यास प्रचंड मोठा होता
कोणाला शेतजमिनीच्या वादावर तोडगा काढून देण्यात, तर अगदी कोणाला नव्या व्यवसायासाठी मदत करण्याच्या निवेदनांना अंतिम उत्तर देत निकाली काढायचे ते म्हणजे अजित अनंतराव पवार.
अजित पवारांना लहानथोर सारेच,'अजितदादा' असं हक्कानं संबोधायचे.
महाराष्ट्राच्या राजकारणात 1982 पासून सक्रिय असणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या वाटेला आलेल्या प्रत्येक जबबादारीला कायमच 100 टक्के न्याय देण्यास प्राधान्य दिलं.
आज बारामती आणि काटेवाडीमध्ये 'अजितदादा अमर रहे', 'परत या परत अजित दादा परत या', 'एकच वादा, अजित दादा', अशा घोषणांनी परिसर दणाणला.