टीम इंडिया चाहत्यांची गर्दी पाहून झाले भावुक

२९ जून रोजी झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता.

४ जुलै रोजी भारतीय संघ भारतात दाखल झाला आणि विमानतळावर चाहत्यांनी भारतीय संघाचे जोरदार स्वागत केले.

या निमित्ताने चाहत्यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केली होती.

आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी इथे जमले होते.

चाहत्यांची गर्दी पाहून संपूर्ण भारतीय संघ भावुक झाला होता.

या विजयी परेडमधील चाहत्यांचे प्रेम पाहून खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियाद्वारे फोटो पोस्ट कारण आभार व्यक्त केले.

विजय परेडमध्ये रोहित आणि विराट यांना ट्रॉफीसोबत पाहून अनेक चाहतेही भावुक झाले होते

या विजयी परेडनंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आणि तिथे देखील या विजयासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्रुती मराठेच्या व्हिंटेज लूकमधील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष