10 वर्ष लहान ‘टप्पू’चा ‘बबिता’सोबत साखरपुडा?
प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय हिंदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील जेठालालपासून ते टप्पू पर्यंतचे सर्व कलाकार आजही आपल्या व्यक्तिरेखांच्या नावाने ओळखले जातात. मात्र, अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली असून नवीन कलाकार मालिकेत दाखल झाली आहेत. दयाबेन देखील मालिकेत नाहीये.बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता सुरूवातीपासूनच तारक मेहता मालिकेसोबत सोडली आहे. टप्पू अर्थात भव्य गांधी याला तारक मेहता मालिकेतून खास ओळख मिळाली आहे. भव्य गांधीने बालकलाकार म्हणून तारख मेहता मालिकेत काम सुरू केले. अनेक वर्ष तो मालिकेसोबत जोडला होता. मात्र, भव्यने मालिकेला सोडचिठ्ठी दिली. सतत मुनमुन दत्ता आणि टप्पूच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या आहेत. हेच नाही तर दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले जाते
नुकताच भव्य गांधी (Bhavya Gandhi) ऊर्फ टप्पू आणि बबिता जी ऊर्फ मुनमुन दत्ता साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जात होते. हेच नाही तर दोघांचा साखरपुडा गुजरामधील वडोदरा शहरात होणार असल्याची तूफान चर्चा होती. आता या साखरपुड्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलताना भव्य गांधी दिसला आहे. नेमके काय घडले हे त्याने सांगितले असून त्याची आई यावर काय बोलली हे देखील त्याने सांगितले आहे.भव्य गांधीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, या साखरपुड्याच्या चर्चेमुळे खूप जास्त गोंधळ उडाला. वडोदरामध्ये साखरपुडा करणार असल्याचे सुरूवातीला पुढे आले होते. ती एक फक्त आणि फक्त अफवा होती. माझ्या आईला फोन येत होती. सततच्या फोनमुळे माझी आई चांगलीच संतापली होती. माझी आई चिडून बोलत होती की, तुम्हाला काही कळते का? वेडे आहात? साखरपुडा होणार ही अफवा होती. मात्र, यामुळे खूप जास्त गोंधळ नक्कीच उडाला होता.
मुळात म्हणजे काही लोकांनी ही अफवा पसरवली होती आणि यामध्ये काहीच सत्य अजिबातच नव्हते. हा मात्र, त्रास झाला. गेल्या काही दिवसांपासून भव्य गांधी आणि मुनमुन दत्ता यांच्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. दोघांच्या वयामुळे खूप जास्त अंतर आहे. भव्य गांधीपेक्षा मुनमुन दत्ता फार जास्त मोठी आहे, मात्र, असे असले तरीही दोघांच्या नात्याबद्दल चर्चा रंगताना दिसतात.




