spot_img

Sunil Tatkare : ‘अशोक खरात’ प्रकरणात सुनील तटकरे काय म्हणाले?

spot_img

स्वतःला ‘भोंदू बाबा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणात सेलिब्रिटी, अधिकारी आणि काही मोठ्या राजकीय व्यक्तींची नावे चर्चेत आल्याने वातावरण अधिकच तापले आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात येत असून, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सुनील तटकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळत, योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, पुढे या प्रकरणात आणखी काय उलगडे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ