spot_img

Sanjay Raut : कोश्यारी-राज ठाकरेंच्या वादात संजय राऊतांची उडी

spot_img

मोदींना घाबरण्याच्या वक्तव्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; राऊतांचा कोश्यारींवर घणाघात

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषिक वक्तव्यावर टीका करत “रटाळ प्रवचनाच्या राजकीय टिप्पणी करू नका” असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते. या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्तच घाबरतात, अशी उपरोधिक टीका केली होती. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक मोदींना घाबरून आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर जोरदार हल्ला चढवला. कोश्यारींना महाराष्ट्रात येऊन अक्कल शिकवण्याचा अधिकार नाही, अशी टीका करत त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधत, सत्तेच्या जोरावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊतांनी कोश्यारींना दिलेल्या पद्मभूषण पुरस्कारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान केल्याचा आरोप करत, अशा व्यक्तींना सन्मान देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी हे जुळणारे नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यात राज ठाकरे यांचा आदर असल्याचे सांगितले. त्यांनी राज ठाकरे हे आपल्या लहान भावासारखे असून, त्यांनी मोदींना घाबरण्याचे कारण नाही, असे मत व्यक्त केले. मोदी सर्वांना समान वागणूक देतात, असेही त्यांनी नमूद केले. चुकीचे काम करणाऱ्यांनीच घाबरावे, असा संदेश त्यांनी दिला. या सर्व वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ