spot_img

IND vs ENG Semifinal T20 World Cup 2026 : वानखेडेवर रंगणार भारत-इंग्लंड महासंग्राम; फायनलच्या तिकिटासाठी दोन्ही संघ सज्ज!

spot_img

इंग्लंडच्या ‘या’ ५ खेळाडूंपासून टीम इंडियाला मोठा धोका; अटीतटीच्या लढतीकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष

टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपांत्य फेरीचे (Semi-finals) चित्र स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि यजमान भारत या चार संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. ४ मार्च रोजी कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत होईल, तर ५ मार्चला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेत चढ-उतार पाहिले असले, तरी त्यांच्या संघात असे काही ‘मॅच विनर’ खेळाडू आहेत जे भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगवू शकतात.

इंग्लंडच्या ताफ्यात सर्वात मोठे आव्हान विल जॅक्स याचे असेल. त्याने १७६ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटण्यासोबतच निर्णायक बळीही घेतले आहेत, त्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा प्रबळ दावेदार मानला जातो. सलामीवीर फिल साल्ट आपल्या आक्रमक फलंदाजीने सुरुवातीच्या षटकांतच सामना भारताच्या हातातून हिरावून घेऊ शकतो. फिरकी गोलंदाज आदिल रशीद याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड धडकी भरवणारा असून, मधल्या फळीत सॅम करन सारखा अष्टपैलू खेळाडू आणि कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवणारा कर्णधार हॅरी ब्रूक भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात.

वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे ५ मार्चला होणारा हा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या या पाच महत्त्वाच्या शिलेदारांना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना विशेष रणनीती आखावी लागेल. घरच्या मैदानावर आणि चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे टीम इंडियाचे पारडे जड असले, तरी गतविजेत्या इंग्लंडला कमी लेखणे भारतासाठी धोक्याचे ठरेल. आता सर्वांच्या नजरा गुरुवारी होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यावर खिळल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ