आज माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आहे.  यानिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊया त्यांची जीवनगाथा...

१९३१ मध्ये याच दिवशी माजी राष्ट्रपतींचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला होता.

भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांनी वैमानिक अभियांत्रिकीमध्ये विशेष तज्ज्ञता मिळवली

 डॉ. एपीजे अब्दुल यांनी भारतातील पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन विकसित करण्यासाठी प्रकल्प संचालक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 ते इस्रोच्या प्रक्षेपण वाहन कार्यक्रमाच्या, विशेषतः पीएसएलव्ही कॉन्फिगरेशनच्या उत्क्रांतीसाठी देखील जबाबदार होते.

इस्रोमध्ये दोन दशके काम केल्यानंतर, डॉ. कलाम यांनी स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि अग्नि-पृथ्वी क्षेपणास्त्रांच्या विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

श्री. कलाम यांना धोरणात्मक क्षेपणास्त्र प्रणालींचे शस्त्रीकरण आणि पोखरण-II अणुचाचण्यांचे श्रेय दिले जाते, ज्यामुळे भारत अण्वस्त्रधारी देश बनला.

 डॉ. एपीजे अब्दुल भारतातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक होते

डॉ. एपीजे अब्दुल ३० विद्यापीठे आणि संस्थांकडून मानद डॉक्टरेट मिळवण्याचा अनोखा मान मिळाला होता.

कलाम यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न यांनी सन्मानित करण्यात आले. २००२ मध्ये ते भारताचे ११ वे राष्ट्रपती बनले.

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.