14.6 C
New York

Ajit Pawar : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले….

Published:

सध्या मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) त्यावर बोलले आहेत. सध्या राज्यात हिंदीवरुन टिकाटिप्पणी सुरु झाली आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, “सध्या कोणाला उद्योग नाहीय. मराठी आपली मातृभाषा आहे. त्याबद्ल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते, त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. मातृभाषा टिकली पाहिजे” “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष दिल्लीत हे प्रकरण पडून होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच धाडस कोणी दाखवलं नाही. ते एनडीएन आणि मोदी साहेबांनी केलं” असं अजित पवार म्हणाले.

“मराठी भाषा भवन मरीन ड्राइव्हला उभारण्यात येणार आहे. त्याचा प्लान तयार आहे. निधीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही. जगात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते. तुमच्या आमच्या कोणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात रहायचं असेल, तर मराठी आलच पाहिजे. भारतात अनेक राज्यात हिंदी भाषा बोलली जाते. काही म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे. त्याच्यावर वाद आहे. पण मला त्या वादात शिरायच नाही. सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत” असं अजित पवार म्हणाले. “इंग्रजी ही जगातील बहुतेक देशात चालते. त्यामुळे ती पण भाषा आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण मातृभाषेला नंबर 1 च स्थान आहे” असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतेय

संघाला हिंदी राष्ट्र बनवायच आहे, यावर अजित पवार म्हणाले की, “आज समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. आज खरतर उन्हाची तीव्रता आहे. उष्माघात आहे. तापमान वाढतय. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतेय. यंदा 103 ते 105 टक्के पाऊस कोसळले, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे, पण तो पाऊस पडला पाहिजे”

Ajit Pawar धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार का?

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याची मागणी होतेय, त्यावर सुद्धा अजित पवार बोलले आहेत. “कोणी काय म्हणाव, उद्या इथे तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील. मधल्या काळात जी घटना घडली, त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. पोलीस तपास सुरु आहे. एसआयटी नेमलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळूनया सगळ्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतील” असं अजित पवार म्हणाले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img