ओतूर,प्रतिनिधी:दि.२४ मार्च ( रमेश तांबे )
ओतूर येथील बाबीतमळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री ठोकळ म्हणाले की,ओतूर ( ता.जुन्नर ) येथील बाबीतमळा या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने, बाबीतमळा येथे पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.
दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये, सोमवारी दि.२४ रोजी पहाटे साडेचार वाजता,अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या कामी ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक दादाभाऊ साबळे,वनरक्षक विश्वनाथ बेले,रोहित लांडे,किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव हे सदर ठिकाणी तात्काळ पोहचून वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांना भ्रणध्वनी वरून माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी वन कर्मचारी तसेच ग्रामस्थ तुकाराम गीते,शिवाजी गीते,वैभव अस्वार,विराज अस्वार,प्रफुल गीते,संस्कार गीते,विकास गीते,प्रदीप तांबे,सुनील मोरे यांच्या मदतीने,पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट्याला रेस्क्यू करून,ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान बाबीत मळा,कॅनॉल या परिसरातून वनविभागाने मागील दीड वर्षात आठ ते दहा बिबटे जेरबंद केले असून, या ठिकाणी अद्यापही बिबट्यांंना वावर असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.