महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) (Maharashtra Government Schools) लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज सभागृहात ही घोषणा केली. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होणार असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकता वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Maharashtra Government Schools शिक्षण सुधारण्याचा सरकारचा महत्त्वाचा निर्णय
राज्य सुकाणू समितीने या अभ्यासक्रमास मान्यता दिली असून इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने CBSE अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. त्यामुळे आता मराठी भाषेत CBSE अंतर्गत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी 1 एप्रिलपासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर CBSE अभ्यासक्रमास राज्याच्या गरजांनुसार आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
Maharashtra Government Schools CBSE अभ्यासक्रमामुळे होणारे फायदे
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाशी जुळवून घेण्यास मदत होईल. स्पर्धात्मक परीक्षा (JEE, NEET, UPSC) आणि उच्च शिक्षणासाठी चांगली तयारी करता येईल. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.