8.9 C
New York

Vijay wadettiwar : दरवर्षी तब्बल 64 हजार महिला राज्यातून बेपत्ताव, डेट्टीवार संतापले

Published:

राज्यातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. यावरून कॉंग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत चिंता व्यक्त केली. पुरोगामी महाराष्ट्रात आज महिलांना सुरक्षेसाठी झगडावे लागते आहे, याबाबत खंत व्यक्त करतानाच यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी सरकारने तुटपुंजी तरतूद केली, यावरही वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी टीका केली. पुणे बस स्थानकात एका महिलेवर अत्याचार झाला, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, ही उदाहरणे देतानाच महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण, असा सवाल सरकारला केला. NCRB ची आकडेवारी सांगते की, महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. दिवसाला 126 गुन्हे नोंदवले जातात तर बालकांविरोधात दररोज 55 गुन्ह्यांची नोंद होते. दरवर्षी 64 हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात, त्यांचे काय होते ? (congress leader vijay wadettiwar is angry over women security in state)

अशी परिस्थिती असतानाही सरकार अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी कुठेही पुरेशी तरतूद करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निर्भया योजने अंतर्गत महिला मदत कक्षाच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात फक्त दोन हजार रुपये तरतूद केली आहे. या सरकारला निर्भया फंडचा विसर पडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना शिंदे गटाने निर्भया फंडचा गैरवापर केला तेव्हा टीका केली होती, आज अजित दादा यांनाच निर्भया फंडचा विसर पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थसंकल्पात महिला सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी 8 हजार रुपये दिले आहेत, एक मंत्र्यांच्या कार्यालयात चहा नाश्त्यासाठी देखील याहून अधिक खर्च होतो अशी टीका वडेट्टीवर यांनी केली. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी देखील विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले? महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.

नागपूर इथे हिंसाचार भडकला यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान ,अशी सतत भडकाऊ वक्तव्ये होत आहेत. त्या मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. छावा कांदबरी अनेक वर्षांपूर्वी आली, चित्रपट येऊन पण महिने होऊन गेले पण नागपूरचा कोरटकर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला यांच्यावर कारवाई होत नाही. समाजात तुम्ही द्वेष पसरवणार आणि सरकार जबाबदारी कशी झटकू शकते. नागपूरमध्ये दगड आले, शस्त्रे आली, पेट्रोल बॉम्ब आले असे मंत्री सांगतात मग हे जमा होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही का? असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

Vijay wadettiwar जलजीवन मिशनचे कामही रखडले

गोसीखुर्द प्रकल्पाला सुप्रमा मिळावा म्हणून प्रस्ताव दिला आहे पण अजूनही कारवाई होत नाही. नवी मुंबई मधील कोंढाणे धरणाचे काम सिडकोला दिले आहे. या धरणाची किंमत 800 कोटींवरून 1400 कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट माणसाला हे काम देण्यासाठी प्रकल्पाची किंमत वाढवली आहे, या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.महाराष्ट्रात जल जीवन मिशनचे काम रखडले आहे. कंत्राटदार काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत, हे काम कोण पूर्ण करणार असा प्रश्न जलसंपदा विभागाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा करताना विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img