13.7 C
New York

Rohit Sharma : रोहित कसोटीतून निवृत्त होऊ शकतो ?

Published:

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) उत्तम नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतेच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघ जूनमध्ये पुन्हा मैदानात उतरणार असून तेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 5 कसोटी सामन्यांची ही मालिका होणार आहे. पण या दौऱ्यावर रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग असेल की नाही, आणि जर तो खेळला तर तो कॅप्टन असेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दौऱ्यात रोहित कसोटीतून निवृत्त होऊ शकतो, अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, त्यानंतर रोहितने निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले. आता त्याच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Rohit Sharma काय आहे नवी अपडेट ?

चॅम्पियन ट्रॉफीच्या जेतेपदानंतर रोहित शर्माच्या कारकिर्दीत मोठे वळण आले आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, आणखी एका मोठ्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीचा पाठिंबा रोहित शर्माला मिळाला आहे. त्यामुळे जून महिन्यातील इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा हाच टीम इंडियाचा कॅप्टन असण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयामुळे रोहित शर्माची कारकिर्द आणखी वाढू शकते, असा कयास वर्तवला जात आहे.

Rohit Sharma ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशामुळे उपस्थित झाले अनेक प्रश्न

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3-1असा पराभव स्वीकारावा लागला होता. या काळात त्याच्या खराब कामगिरीमुळे रोहितने मालिकेतील शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माने विश्रांती घेताच ही मालिका संपताच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा चाहत्यांमध्ये पसरू लागल्या. रोहितने कसोटीचा फॉरमॅट सोडावा, असे मत काही दिग्गजांनी व्यक्त केलं होतं. पण रोहितने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना मोठे वक्तव्य केलं.

सिडनी कसोटीच्या दुस-या दिवशी लंच टाईमवर एका वाहिनीशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘आत्ता धावा निघत नाहीयेत, पण 5 महिन्यांनंतरही त्या येणार नाहीत याची शाश्वती नाही. मी मेहनत करीन. पण हा निर्णय निवृत्तीचा नाही. मी निवृत्त कधी व्हायचं आणि मला काय निर्णय घ्यायचा ते बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरवू शकत नाहीत,’ असं रोहितने सुनावलं होतं. रोहितने या मालिकेतील 3 सामन्यात 3, 6, 10, 2 आणि 9 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच भारतीय कर्णधाराने 5 डावात 6.20 च्या सरासरीने एकूण 31 धावा केल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआय इंग्लंड मालिकेत नवीन कर्णधाराची निवड करू शकते, असा दावा त्यानंतर करण्यात येत होता. मात्र सध्या तशी कोणतीही परिस्थिती नसून रोहितच कर्णधारपद शाबूत असल्यातचं चित्र दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img