-4.3 C
New York

Eknath Shinde : शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही; ‘एकनाथ पर्व’मधून शिंदे गरजले

Published:

अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस रात्रं काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. (Eknath Shinde) या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकटं आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही, असं प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेकडून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठ पद मिळाले, मानसन्मान मिळाला पण काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचले नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला.

चार भिंतीत एकनाथ शिंदे रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार, असे शिंदे म्हणाले. काहीजण कोविड होता तेव्हा घरात हात धुवत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता पीपीई किट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले. अडीच वर्षांतील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली, असे ते म्हणाले.

संतोष देशमुखांची टीप दिल्याचा ज्याच्यावर आरोप, त्याची होणार सुटका; आदेश काय?

ठाण्यात आपण वाढलो. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलतंय. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना रक्ताचे पाणी केले.

या काळात इर्शाळगडावरील बचाव कार्य, कोल्हापूरचा पूर, चिपळूणमधील पूर आणि बचाव कार्याच्या आठवणी शिंदे यांनी यावेळी काढल्या. इर्शाळवाडीचे पुनर्वसन केले आणि तेथील नागरिकांना पक्की घरे दिली, असे ते म्हणाले. व्यासपीठावरील गर्दी आणि समोर बसलेले कार्यकर्ते हीच खरी आपली दौलत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर होते. आपण मात्र उठाव केला आणि जनतेच्या मनातले सरकार आणले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना अडीच वर्षात मागच्या अडीच वर्षांची कमतरता भरुन काढलीच शिवाय पुढील १० वर्षांची पायाभरणी केली, अशी जनभावना आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्षात शिवसेनेत राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करत आहेत. शिवसेनेची ताकद वाढत आहेत.

शिवसेना आणखी मजबूत झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निगाहों मे मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे, हवाओं ने बहोत कोशिश की, मगर चिराग आंधीयों मे भी चलता रहा शेर बोलून दाखवला. ते पुढे म्हणाले की, आता कितीही संकटे आली तरीही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img