25.5 C
New York

Union Budget 2025 : सहा वर्षांत खाद्यतेलाचं टेन्शन मिटणार! अर्थमंत्री सितारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Published:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Union Budget 2025) सादर केलं. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचं (NDA Government) हे पहिलं पूर्ण बजेट होतं. त्यामुळे देशातील जनतेबरोबरच सरकारमधील घटक पक्षांचंही बजेटकडे लक्ष होतं. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसेच खाद्यतेलांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा केली.

भारत खाद्यतेलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. तेल आयात करावे लागते. यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारतात तेलाचं उत्पादन अतिशय कमी आहे. या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकार यावर काम करत आहे. यात सुधारणा करून देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचं उद्दीष्ट सरकारने निश्चित केलं आहे. यासाठी सरकार सहा वर्षांत एक खास मिशन सुरू करणार आहे. या मिशनची घोषणा आज अर्थमंत्री सितारामण यांनी केली.

सितारामण म्हणाल्या, टॅक्स, पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, मायनिंग, फायनान्शिअल सेक्टर आणि रेग्युलेटरी पॉलिसी या सहा प्रमुख क्षेत्रांत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे अर्थमंत्री सितारामण यांनी सांगितले.

Union Budget 2025 बजेटमधील महत्वाच्या बाबी

भारतीय खेळणी उद्योगासाठी सपोर्ट स्किम
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये.
स्वस्त दरात शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत कर्ज देणार. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना पाच वर्षांचे पॅकेज.
कृषी योजनांचा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img