10.8 C
New York

Budget 2025 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा एका क्लिकवर…

Published:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला प्रगतीकडे नेणं हेचं आमचं लक्ष आहे. तर सबका विकास हेच आमचं उद्धिष्ट आहे. गेल्या 10 वर्षांचा आपला विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि संरचनात्मक सुधारणांनी जागतिक लक्ष वेधलंय. या काळात भारताच्या क्षमता आणि क्षमतेवरील विश्वास वाढला आहे.

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थमंत्र्‍यांनी केलीय. राज्याच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार. आसाममधील नामरूप येथील युरिया प्लांट उभारण्यात येणार आहे. आसाममधील नामरूप येथे 12.7 लाख मेट्रिक टन वार्षिक क्षमतेचा एक प्रकल्प उभारला जाईल. पूर्वेकडील भागातील तीन बंद युरिया प्लांट पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, युरिया उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल टाकलं जातंय.

विमा क्षेत्रात शंभर टक्के विदेशी गुंतवणूक, अर्थमंत्री सितारामण यांची मोठी घोषणा

100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना. शेतकऱ्यांना योग्य दर देणार. तूर उडीद मसूर कडधान्याचं 6 वर्षांचं मिशन, कॉटन प्रोडक्शनसाठी 5 वर्षांची मोहिम सुरू केली जाणार आहे. पूर्व भारतात यूरिया प्लांट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. किसान क्रेडीट कार्डवर कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय.

2025 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित विकास उपाययोजनांमध्ये गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दहा व्यापक क्षेत्रांचा समावेश आहे. कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे, ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे, समावेशक विकास मार्गावर सर्वांना एकत्र आणणे, एमएसएमईंना पाठिंबा देणे, कृषी विकास आणि उत्पादकता वाढवणे, रोजगार-नेतृत्वाखालील विकास सक्षम करणे, अर्थव्यवस्था आणि नवोपक्रमात गुंतवणूक करणे, ऊर्जा पुरवठा सुरक्षित करणेनिर्यातीला प्रोत्साहन देणे, नवोपक्रमाचे पालनपोषण करणे याचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img