14.3 C
New York

Mantralay :  नक्की काय घडलं,आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या…

Published:

राज्याच्या राजकारणात धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Mantralay) सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Jhirwal) यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या आहेत.

Mantralay भरती करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडं प्लॅन बी तयार आहे, असं काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img