14.3 C
New York

Harshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली

Published:

भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपचे मोठे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil)  यांनी अखेर भाजपला राम-राम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात प्रवेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज इंदापूर येथे जाहीर कार्यक्रमात आपण या पक्षात जायचं की नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांशी करून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.

काल शरद पवार यांची आणि माझी सिल्वर ओकला बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार मला म्हणाले इंदापूरमधील अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे तुमच्या लोकांशी चर्चा करुन तुम्ही निर्णय घ्या, त्या पुढची जबाबदारी माझी असं पवार आपल्याला म्हणल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसंच, शरद पवार यांच्याशी चर्चेअगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे. त्या चर्चेत फडणवीस यांनी आपली अडचण समजून घ्या असं म्हटल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

Harshvardhan Patil कार्यकर्त्यांना विचारले…अन्

इंदापूर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा तालुका आहे. आपल्याला आज अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायाचे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हो सांगितले. त्यानंतर आपण आता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाची घोषणा करत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

आमची झोप उडाली, शरद पवार असं का म्हणाले?

Harshvardhan Patil पवार साहेब म्हणाले, तुम्ही…

विधानसभा निवडणूक संदर्भात शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. तालुक्यातील बऱ्याच लोकांचा तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह आहे असे पवार साहेब म्हणाले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह मी मोडू शकत नाही, असे मी त्यांना सांगितले आणि भाजप सोडण्याचा निर्णय त्यांना सांगितला. तालुक्यातील जनतेला काय वाटते त्याचा आदर मी करणार आहे. त्यावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे फडणवीस म्हणाले.त्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो.

Harshvardhan Patil राजकीय वनवास संपणार

2019 ची निवडणूक आपण जिंकता जिंकता हरलो. 2014 चा पराभवाची खदखद आहे. आपल्याला काय त्रास सहन करावा लागला हे आपण पाहिले. आता आपल्याला कुणाविषयी वाईट बोलायचे नाही. आपल्याला संयम पाळायला आहे. पवार साहेबांचे आणि आपले व्यक्तिगत संबंध आहेत. कुणावर टीका करू नका. आपण सुसंस्कृत आहोत. येत्या काळात इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपल्याशिवय राहणार नाही. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणे हा आपला रोल. आता तुमच्या आणि जनतेची इच्छेनुसार पक्ष प्रवेश करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img