16 C
New York

Mumbai News : लहान मुलांच्या कर्करोग जनजागृतीसाठी पदयात्रा

Published:

मुंबई / रमेश औताडे

लहान मुलांमधील वाढता कर्करोग रोखण्याची नितांत गरज आहे. (Mumbai News) बदलती जीवनशैली व आहार विहाराचे बिघडले संतुलन पाहता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करत निरू फाऊंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी मुंबई नरिमन पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपर्यंत विद्यार्थी जनजागृती पदयात्रा फेरी काढली.

या जनजागृती पदयात्रे मध्ये सुमारे आठ शाळांमधील एन एस एस चे विद्यार्थी व गृहलक्ष्मी मिस इंडिया डॉ. फरजाना लकडावाला यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी कर्करोगाने पीडित मुलांना जवळ घेत मायेचा ओलावा दिला. कॅन्सरग्रस्त मुलांसाठी नेहमी काम करणाऱ्या नीरू फाउंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहुल रामुगडे व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img