19 C
New York

Raj Thackeray :  लााडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची नाराजी

Published:

विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जातोय. (Raj Thackeray) मात्र विरोधकांच्या पोटात दुखतंय असं म्हणत सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात मग्न आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. जुलै महिन्यात घोषणा झालेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो महिलांनी अर्जकेले असून अनेकींचा खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे जमा झालेत. मात्र विरोधांकाची त्यावरून अद्याप टीका सुरूच असून आता त्यामध्ये एका नेत्याचे नाव जोडलं गेलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ‘ जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘ राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. राज्यात नवीन उद्योग महिलांन अशा प्रकारे पैसे न देता आणा’ असं म्हणत या योजनेवर अप्रत्यक्षरित्या राज ठाकरेंनी टीका केली आहे.

Raj Thackeray राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झटून कामाला लागले असून त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल आणि आज ( 27-28 सप्टेंबर) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्याचा राज ठाकरे यांच्या दुसरा दिवस असून आज ते पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचा आढावा घेत आहेत. नागपूर, चंद्रपूर,भांडारा,गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे. तर काल त्यांनी पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला,यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला.

महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Raj Thackeray लााडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची नाराजी

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य केलं. त्यावेळी ते काय म्हणाले जाणून घेऊया…

1) जानेवारी महिन्यात ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसणार.

2) सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणा होईल.

3) राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे.

4) राज्यात नवीन उद्योग महिलांना अशा प्रकारे पैसे न देता आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे.

5) समाजातील कोणताही घटना फुकट काही मागत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img