16.8 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांचा थेट मनोज जरांगे पाटलांवर घाव,म्हणाले..

Published:

लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदलणार याचं खोटं कथन तर होतेच, मराठा आंदोलकांनाही छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीला मदत केली. (Maratha Reservation) सोयाबीन आणि कापसाच्या दराचा प्रश्न होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अलिकडच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे नाराजीची तीव्रता कमी झाली असल्याचा दावा उपमुख्यमंत्री केला. ते मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. लाडकी बहीणीचे जेवढे मेळावे येत्या काळात होतील त्यातून मतदान बदलेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

घटना बदलाचे कथन खोटे होते हे आता कळू लागले आहे. याच काळात सोयाबीनचा दर कमी होता. आयात शुल्कात निवडणुकीनंतर आता वाढ केल्याने सोयाबीनचे दर आता 4500 रुपयांवर गेले आहेत. ते पाच हजार रुपयांपर्यंत जातील. शिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीन कापसाचे भाव कमी झाल्याने मंजूर केलेली भावंतर योजनेचे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. दरही वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा नाराजीची तीव्रता कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्यातून हे दिसून येत आहे. पण भाजप कार्यकर्ताच अपराधबोधात वावरत आहेत. संवेदनशीलता हवी पण केलेले निर्णय सांगायला शिकले पाहिजे. फडणवीस म्हणाले,जे निर्णय झाले नाहीत ते आम्हीच पूर्ण करू शकतो असा विश्वासही द्यायला हवा.

पुढील 3 ते 4 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Devendra Fadnavis ओबीसीतून आरक्षणाचे वचन लिहून घ्यावे-

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाईल असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मनोज जरांगे यांनी लिहून घ्यावे आणि त्यांना मदत करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षण प्रश्नी सर्व पक्षीय बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांचीही स्वाक्षरी असल्याचा कागद सरकारकडे असल्याचा दावा फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. ते खोटे कथन करतात. त्यांनी केलेल्या खोट्या नेरेटिव्हला भाजपचे कार्यकर्ते उत्तर देत नाहीत. 1982 साली मराठा आरक्षण प्रश्न बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांची मागणी कॉग्रेस आणि शरद पवार यांनी कधी पूर्ण केली नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ही मागणी भाजपने पूर्ण केली.

आरक्षण टिकवले. त्यातून अनेकांना आता नोकऱ्या लागू लागल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते तरी देखील घेतलेले निर्णय सांगत नाहीत. आजही उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ असे लिहून घ्यावे आणि जरांगे यांनी मग त्यांना मदत करावी, असे फडणवीस म्हणाले. वेगवेगळे पक्ष घेत असलेल्या भूमिका पुन्हा ‘ एक्सपोज ’ केल्या जात आहेत. पुढेही हे काम होईल. पण शरद पवार हे नेहमी दुटप्पी भूमिका घेतात. ती बाब सर्व सामांन्यासमोर आणायला हवी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img