16.8 C
New York

Rain Update : पुढील 3 ते 4 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Published:

पुढील ३-४ तास मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार (Rain Update) पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. (Rain) त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Update मध्यम स्वरुपाचा पाऊस

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. नाशिक, धुळे ,जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसंच, वारा ३० ते ४० किलो मीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर निघालं, अटी काय?

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. काल रात्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. तसंच, परतीच्या पावसानं पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरली आहेत.

या जिल्ह्यांना सतर्कता

त्यामुळं मुळा-मुठा तसंच पवना नदी पात्रातील विसर्ग या धरणांमधून वाढवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी पूरस्थितीपासून सावध रहावं असा इशारा देण्यात आला आहे. 24 सप्टेंबरला पुढील जिल्ह्यांत विजांसह पाऊस पाहायला मिळाला त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर | लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img