17.4 C
New York

Maharashtra Rain : आजपासून पावसाचे धुमशान! ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार

Published:

पावसाचा फारसा (Maharashtra Rain) जोर राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दिसला नाही. पावसासाठी पोषक वातावरण आता मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार झाले आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राज्यात अनेक ठिकाणी (Heavy Rain) व्यक्त होत आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास या परिस्थितीमुळे लांबण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या (IMD Alert) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. नगर शहरात रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस झाला.

हवामान विभागाच्या (Weather Update) ताज्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 8 उच्च न्यायालयाला अखेर मिळाले सरन्यायाधीश

पुणे, सातारा, सांगली, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, जळगाव जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पुनरागमन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 26 ते 3 ऑक्टोबर या काळात दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर जास्त राहिल अशी शक्यता आहे. तसेच 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या काळातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका

सलग 11 दिवस पाऊस राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचं हा पाऊस झाला, तर मोठं नुकसान होऊ शकतं. शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात यापूर्वीच्या पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची शेतकऱ्यांनी गरज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img