26.6 C
New York

Sharad Pawar : या सरकारला खड्यासारखे बाजूला काढा,शरद पवार यांचा महायुती सरकारवर हल्ला

Published:

शिंदखेड्यात शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला. या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्ला केला. आपण दहा वर्ष कृषी विभागाचे काम करत होतो, तेव्हा देश अन्नधान्यसंदर्भात स्वयंपूर्ण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले की, आजच्या राज्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही. त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबवले जात नाही. कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे. मोदी सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचे पीक घेतले. त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली. गहू, तांदुळावर बंदी घातली. जे, जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणारा देशात दहा वर्ष म्हणून मी शेतीचे जे काम केले त्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला.

Sharad Pawar बहिणींचा सन्मान राखला जावा, पण…

शरद पवार धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. जेसीबीवरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शरद पवार म्हणाले, आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या २० वर्षांत काहीच विकास झाला नाही. हे सरकार बहिणींना 1500 हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचे लक्ष नाही, असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर शरद पवार यांनी केला.

गडकरींना PM पदाची ऑफर? राऊत म्हणतात, ‘गडकरींच्या वक्तव्यात काही…

Sharad Pawar आता या सरकारला खड्यासारखे बाजूला काढा

सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला काढा. शरद पवार यांनी म्हटले, या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे, महाविकास आघाडीच्या हातात तुम्ही हे राज्य द्या, तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसणार, अशी ग्वाही मी देतो, असे शरद पवार यांनी या मेळाव्यात सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img