26.6 C
New York

Maharashtra Opinion Poll : महायुती आणि मविआमध्ये कोण ठरणार वरचढ?

Published:

विधानसभा निवडणुकीची घोषणा महाराष्ट्रात अद्याप झाली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला (Maharashtra Opinion Poll) सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती महाराष्ट्रात यांच्यात प्रमुख लढत होणार असली तरी इतर छोट्या पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तविणारा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोण वरचढ ठरणार याबद्दल जाणून घेऊया… (Who will come out on top in Mahayuti and Maviya in Maharashtra opinion poll)

टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रीज (times now matrize opinion poll) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओपिनियन पोल जारी केला आहे. भाजपाच्या जागा या पोलनुसार, घटणार असल्याचे समोर येत आहे. मात्र भाजपाच्या जागा घटणार असल्या तरी याचा महायुतीला जास्त फटका बसताना दिसत नाही. 137-152 जागा ओपिनियन पोलनुसार, महायुतीला मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भाजपला 83 ते 93 म्हणजेच 26.2 टक्के या पोलमध्ये जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला 42 ते 52 म्हणजेच 16.4 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 07 ते 12 म्हणजेच 2.8 टक्के मिळण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 58 ते 68 जागा म्हणजेच 16.2 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 म्हणजेच 14.2 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 35 ते 45 जागा म्हणजेच 13.7 टक्के मिळतील. याशिवाय अपक्षांना 03 ते 08 जागा म्हणजेच 10.1 टक्के मिळण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Opinion Poll एकनाथ शिंदे मुख्यमंत्रि‍पदासाठी आवडता चेहरा

महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाची चेहरा जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर पोलमध्ये महाविकास आघाडीने निवडणुकीआधी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर केल्यास काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 43 टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तविला आहे. याशिवाय 29 टक्के सकारात्मक परिणाम होईल, 14 विशेष परिणाम होणार नाही आणइ 14 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असा अंदाज वर्तविला आहे. तर 37 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी पसंती दर्शविली आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकावर अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आहेत. दोघांनाही 21 टक्के पसंती मिळाली आहे. तर शरद पवार यांना 10 टक्के आणि इतर 11 टक्के असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

..म्हणून अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतात; माजी मंत्र्याने कारणही सांगितलं

Maharashtra Opinion Poll मराठा आरक्षण मुद्द्याचा महायुतीवर परिणाम होणार

ओपिनियन पोलनुसार, मराठा आरक्षण मुद्द्याचा महायुतीवर परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 34 टक्के लोकांनी नुकसान होईल असे म्हटले आहे, तर 24 टक्के लोकांनी फायदा होईल, असेही स्पष्ट केले आहे. तर 31 टक्के लोकांनी कोणताही परिणाम होणार नाही आणि 11 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असे म्हटले आहे.

Maharashtra Opinion Poll दलित आणि आदिवासी मतदारांची कोणाला पसंती?

दरम्यान, 43 टक्के दलित मतदारांनी महायुतीला पसंती दर्शवली आहे. तर 32 टक्के मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. याशिवाय. 21 टक्के मतदार इतर आघाडी आणि 4 टक्के मतदारांनी सांगून शकत नसल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे 42 टक्के मतदारांनी महाविकास आघाडीचा पसंती दर्शविली आहे. तर 34 टक्के महायुतीच्या बाजूने आहे. याशिवाय 14 टक्के मतदारांनी इतर आणि 10 टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असा अंदाज वर्तविला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img