23.1 C
New York

Sharad Pawar : ‘हा’ सरकारच्या भ्रष्टचाराचा नमूना, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Published:

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे नमूना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar काय म्हणाले शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या इतिहासात अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. आम्ही सरकारचा निषेध त्यामुळे करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार

राज्यात देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांचा पुतळ पडला. तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचा धर्म होता. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. आम्ही आंदोलन महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

मविआचं जोडे मारो आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar …या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा

शरद पवार तब्येत बरी नसतानाही आले आहे. वयाचे बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी शाहू महाराज आणि शरद पवार आले आहेत. मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितल. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे. जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img