26.6 C
New York

Eknath Shinde : “आघाडीला जनताच जोड्याने मारेल” ‘मविआ’च्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका

Published:

Eknath Shinde : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत जोडे मारो आंदोलन करत सरकारविरोधात मोर्चा काढला होता.मात्र, जोडे मारो आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीलाच जनताच जोडे मारणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन मोर्चा काढण्यात आला.गेट वे ऑफ इंडिया येथे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी ‘गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही’ अशी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

मात्र, हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नव्हे तर राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.मविआ’च्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीत तर ते आमच्या अस्मितेचा विषय आहेत.

हनी सिंग याच्याकडून हैराण करणारा खुलासा… भारतात…

. मात्र, घडलेल्या घटनेचं राजकारण विरोधक करतायत हे जास्त दुर्दैवी आहे.”कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझरने शिवाजी महाराजांचा पुतळा दोन जेसीबी लावून तोडला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जोड्याने मारणार आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img