20.6 C
New York

Mumbai Local  : लवकरच मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार

Published:

मुंबईकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी बातमी दिली आहे. (Mumbai Local)  मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आता मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढवणार आहेत. मुंबईकरांचा वेळ आता खूप वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या १२ रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण १६ हजार २४० कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

Mumbai Local कोणते आहेत 12 प्रकल्प

१. सीएसटीएम ते कुर्ला पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.

२. मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्व लाईन होणार आहे. ३० किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.

३. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे.

४. बोरवली ते विरार पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.

५. विरार ते डाहून रोड तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. ६४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.

हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम कारण …, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना सुनावलं

६. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे.

७. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. अखंड रेल्वे कनेक्शन वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान यामुळे होणार आहे.

८. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. ३२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.

९. तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग कल्याण-बदलापूर दरम्यान होणार आहे. १४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.

१०. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील यामुळे गर्दी कमी होणार आहे.

११. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येणार आहे.

१२. निळजे ते कोपर दरम्यानच्या 5 किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img