26.6 C
New York

Rajendra Gavit : माजी खासदार गावित यांची रेल्वे मागणी मान्य; मार्ग सर्वेक्षणासाठी अडीच कोटी मंजूर

Published:

(पालघर):

उमरोली – नाशिक हा ९६ किलो मीटर चा रेल्वे मार्ग पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा ठरणार यासाठी पालघर लोकसभेचे तत्कालीन खासदार राजेंद्र गावित (Rajendra gavit) व संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य कॅप्टन विनीत मुकणे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री आश्र्विनी वैष्णव यांची दिल्ली बोर्ड येथे भेट घेवून मागणी केली होती, दरम्यान ही मागणी मान्य होऊन, याकरिता लागणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व्हावे म्हणून अडीच कोटी मंजूर करण्यात आले असल्याचे माजी खासदार गावित यांनी सांगितले.

डहाणू ते नाशिक व्हाया त्र्यंबकेश्वर चला रेल्वेने

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची बाराही महिने गर्दी असते. प्रभू रामचंद्र जेथे वनवासात राहिले त्या नाशिकमधील पंचवटीलाही असंख्य भाविक भेट देतात. पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार, सफाळा, वैतरणापालघर, बोईसर, डहाणू येथील भाविकांना आणि प्रवाशांना आता लवकरच डहाणू येथून शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग
थेट नाशिकला रेल्वेने जाता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवा रेल्वे मार्ग लवकरच आकाराला येणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील आणि त्यामुळे तेथील विकासाला चालना मिळून आर्थिक उलाढालही वाढेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमार्गे नाशिक ते डहाणू हा शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग दोन प्रमुख शहरांना जोडणार आहे. या रेल्वेमार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होऊन महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासाचे एक नवे दालन खुले होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने अडीच कोटी रुपये मंजूर केले असून या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वे खात्याने दिली आहे.

उमरोळी ते नाशिक रेल्वे मार्गे बाबा म्हणून मी सतत पाठपुरावा करत होतो, सर्वेक्षणाची मंजुरी मिळाल्याने येथील आदिवासी ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होऊन येथील पर्यटन भरण्यास मदत होऊ शकेल.
राजेंद्र गावित,माजी खासदार,पालघर

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img