26.6 C
New York

Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत, प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक शंका

Published:

मुंबई

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-अत्यारोप सुरु आहेत.या वादात प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आणखी भर घातल्याचे दिसते.

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आले आहेत. परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फूले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्‍यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मला असा संशय येतो आहे की हा पुतळा पडला की पाडला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही? असा सवास आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

कारण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केल्या गेल्या नाही ना? अशा संशयाला जागा आहे. त्यामुळे या पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहेय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. तर या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेची माफी का मागत नाही?, याचाही खुलासा करण्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, तिसऱ्या आघाडी संदर्भात 10 सप्टेंबरला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं ते म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते.

26 ऑगस्टला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेमुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या डिझायनर व कंन्सल्टिंग एजन्सीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img