23.1 C
New York

Badlapur Crime : बदलापुरातील आंदोलनानंतर तब्बल 1500 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Published:

बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या (Badlapur Crime) घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले (Maharashtra) होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि (Railway Station) संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. काही आंदोलकांनी शाळेचीही तोडफोड केली.

यानंतर पोलिसांनी आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. काल दुपारपर्यंत तीनशे ते चारशे आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याचे सांगितले होते. आता मात्र यामध्ये वाढ झाली आहे. तीन स्थानिक पोलीस ठाण्यांसह रेल्वे पोलीस ठाण्यात एकूण दीड हजार आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस बाकीच्या आंदोलकांचा शोध घेत आहे.

आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. रेल्वे रोको, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांचे वकिलपत्र घेण्यासाठी अनेक वकील पुढे आले आहेत.

तर दुसरीकडे राज्य सरकारने या प्रकरणात कारवाईची सुरुवात करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना (Badlapur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तापासाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. एसआयटी स्थापन केल्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होईल असे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img