23.1 C
New York

Badlapur School Case : बदलापूर घटनेवरुन अंधारेंचा CM शिंदे, फडणवीसांवर हल्लाबोल

Published:

मुंबई

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या (Badlapur School Case) घटनेनंतर राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) रिपोर्टकार्डच बाहेर काढले आहे. राज्याला कधी नव्हे असा कुचकामी आणि नापास गृहमंत्री मिळाला आहे अशी जिव्हारी लागणारी टीकाही अंधारेंनी केली आहे. त्या बदलापूर येथे माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी अंधारेंनी काल बदलापूरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला. रामगिरी महाराजांना भेटायला शिंदेंकडे वेळ आहे पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही असा सवाल करत वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारबद्दल बोलणाऱ्या वामन म्हात्रेला अटक झाली पाहिजे अशी मागणीही अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्वात पहिले समोर येऊन व्यक्त होणे महत्त्वाचे होते. मात्र, जबाबदार व्यक्ती सोडून टिल्ले-पिल्ले लोक बोलतात असे म्हणत काल आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी चर्चा करणारे गिरीश महाजन कोण? ते या खात्याचे मंत्री आहेत का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. या सर्व घडामोडींवर महाजनांचा बोलायचा काय संबंध असेही त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला फडणवीसांकडून अपेक्षा आहेत मग का नेमक्यावेळी फडणवीस बॅकसीट घेतात आणि इतरांना पुढे करतात असे म्हणत काल बदलापुरातील परिस्थिती नीट हाताळलं असती तर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं नसतं. काल माध्यमांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे आणि हिंसाचाराचे फुटेज लोकांचा रोष वाढू नये म्हणून कुठेही सार्वजनिक होऊ दिले नाही. मात्र, जर हे फुटेज बघितले तर, तुमचे पोलीस किती अमानुषपणे वागले हे धडधडीत दिसत असल्याचे अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, तसंच यावेळी त्यांनी बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना महिला बातमीदाराला धमकी देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना अटक का केली नाही? असा सवाल देखील उपस्थित केला. बदलापूर अत्याचार घटनेवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, उरण-पनवेलची घटना ताजी आहे. वरळीत कारने महिलेल्या उडवणाऱ्या मिहिर शहाचं पुढे काय झालं हे माहिती नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img