23.1 C
New York

Rakshabandhan : रक्षाबंधनाला अजित दादांना राखी बांधणार का ? सुप्रिया सुळे, म्हणाल्या…

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असच चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) दिसलं होतं अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा सामनाच या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लाडकी बहीण चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहीण आणि भावामध्ये सध्या गुलाबी वॉर सुरु आहे. बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे राखीपौर्णिमा(Rakshabandhan). यंदाचे रक्षाबंधन अगदी चार दिवसांवर अर्थात 19 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) या त्यांच्या भावाला म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का?, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी एकाच शब्दात उत्तर दिले.

सुप्रिया सुळेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी कळेल असं एका शब्दात उत्तर दिलं. तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर आहे. हे देखील पाहायला हवे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन अजित पवार यांनी 40 आमदारांना सोबत घेत भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आता दोन गट पडले आहे. तर पवार कुटुंबात देखील राजकीय गटातटाचे राजकारण सुरू झाले. दुसरीकडे शरद पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात लोकसभा निवडणुकीत मतभेद पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img