26.6 C
New York

Devendra Fadnavis : फडणवीसांना ‘या’ खात्याचे मंत्री करा जरांगेंचा हल्लाबोल

Published:

मुंबई

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अनेकदा सरकारविरोधात आंदोलन केलं. मात्र, अद्यापही आरक्षणावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं ते सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका करत आहेत. आताही त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. राज्यात एक संपवा-संपवीचं खातं निघालं पाहिजे. ते खाते फडणवीसांकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला, असा आरोप जरांगेंनी केला. जरांगे-पाटील यांनी बुधवारी अंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून माझ्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. कारण द्यायचं नाही, असं त्यांचं ठरलं आहे. सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावायची आहेत, त्यांना दंगलीड घडवायच्या आहेत. सरकारने सरळसरळ फसवा-फसवी केली. राज्यात एक संपवा-संपवी खातं निघालं पाहिजे. ते खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी मराठा, मुस्लिम, धनगर संपवला. त्यासह मोठ्या जाती संपवण्याचं कामही त्यांनी केलं. पाच वर्षे काम केलं नाही. फक्त फोडोफोडी त्यांनी केली, अशी टीका जरांगेंनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील, पण फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत, असंही जरांगे म्हणाले.

फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी. सत्ता मिळविण्यासाठी काढू नये. कारण आरक्षण दिलं नाही तर सत्ता मिळतच नसते. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोन समाजाला संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं, असा आरोपही जरांगेंनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img