23.1 C
New York

Prakash Ambedkar : राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाका, असं का म्हणाले आंबेडकर?

Published:

अमरावती

शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. ते सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावर वंचीत बहुजन आघाडीचे (Prakash Ambedkar) प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, अशा लोकांवर ताडा कोर्ट लागला पाहिजे. सरकारने कुठलाह विचार न करता त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे. ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवावी असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.

ओबीसी हा मराठ्याला आणि मराठा ओबीसीला मतदान करणार नाही. आपलं आरक्षण जातंय, याची जाणीव झालेली आहे. मराठवाड्यातून विदर्भात आलो तेव्हा पहिली बैठक ओबीसीसोबत झाली विदर्भातला कुणबी हा ओबीसी आहे. पण ऐरणीची वेळ आली तर हा कोणासोबत असेल? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसंच, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्याचं काही अस्तित्व नाही त्यावर मी कमेंट करणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img