18.6 C
New York

Jitendra Awahad : ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

Published:

ठाणे

माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांच्या गाडीवर ठाण्यामध्ये हल्ला झाला आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Maharaj Chhatrapati) यांच्याबाबत केलेलं विधान त्यांना भोवलं असून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली. छत्रपती संभाजी महाराज यांचं रक्त हिरवं आहे असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडून घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.

जितेंद्र आव्हाड त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना 3 ते 4 हल्लेखोर आले त्यांनी गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. ठाण्याच्या दिशेने आव्हाड त्यांच्या घरी निघाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान केला, अशी भूमिका स्वराज्य संघटनेने मांडली आहे. आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी देखील स्वराज्य संघटनेने केली होती. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img