26.6 C
New York

Uddhav Thackeray : एक तर फडणवीस राहतील किंवा मी…, उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

Published:

मुंबई

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची (Assembly elections) तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा (BJP) आणि देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) घाम फोडला, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेताल. या मेळाव्यात त्यांनी हल्लाबोल केला. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट अंगावर जाण्याचे आदेश दिले. अंगावर जा बिन्धास्त असे ते म्हणाले. तसेच एक तर तू राहशील नाहीतर मी असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला. उध्दव ठाकरे यांच्या या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण केली आहे आणि आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराज आणि मावळे हे हर हर महादेव म्हणत तुटून पडायचे. मुंबईतील ४ खासदार निवडून आणल्याचा उल्लेख करून त्यांनी शिवसेनेच्या सामर्थ्याची चर्चा केली. लोकसभा निर्णयानंतर अनेक INDIA चे नेते भेटले आणि आपल्याला जाणवले की आप ने तो देश को दिशा दिखाई। किसी की हिम्मत नही मोदी को बोलने की। ठाकरे यांनी भाजपाला षंढ म्हटले आणि आरोप केले की पक्षाने त्यांच्या बापाला चोरले. नडलो तर असा नडलो की मोदी ला घाम फुटला असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना गांजलेला नाही तळपती तलवार. 2 मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांनी म्हटले की, मनसुबे मुंबई आणि महाराष्ट्र भिकारी करण्यासाठी आहे. मी का अदानी ल विरोध करतोय? पण घरणेशहीवर टीका केली त्या परंपरेचा मी आहे असे स्पष्ट केले. मुंबईतील मोक्याच्या जागांवर टॉवर्स उभारून त्यावर दादागिरी करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img